Saturday, August 13, 2011

पराभवाच्या निमित्ताने...



" मावळत्या दिनकरा...अर्घ्य जोडूनी तुझं दोन्ही करा... "
या ओळीचा विसर पडलाय आमच्या लोकांना....
इथे आता फक्त उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते...
त्यामुळे..जिंकला असेल तुम्ही World Cup...पण तो आता भूतकाळ झालाय....

                क्रिकेट आमच्या रक्तात आहे..आमचा दिवस क्रिकेट ने चालू होतो आणि त्यानेच संपतो...
पानाच्या टपरी पासून कॉर्पोरेट ऑफिसच्या cubical पर्यंत सगळी कडे आम्हाला २२  यार्डाची खेळपट्टीच दिसते..
घरच्यांना आलेल्या खोकल्यापेक्षा सचिन ला झालेला खोकला आम्हाला लवकर कळतो....
प्रत्येक धाव, प्रत्येक ball , प्रत्येक wicket प्रत्येक विजय, प्रत्येक पराभवाची नोंद facebook,twitter,
ओर्कुट, G+ या ठिकाणी आम्ही स्वतंत्र्यरित्या ठेवतो...

                मला अजूनही स्पष्ट आठवतंय..
४ महिन्या पूर्वीचीच गोष्ट आहे...याच ११ लोकांसाठी सबंध भारत रस्त्यावर उतरला होता...फोटोला
पाया पडण्यापासून चेहेर्यावर मुखवटा घालण्या पर्यंत सगळे सोपस्कार पार पडले होते...
सचिन च्या शतकानंतर मोबाईलचा फुल झालेला inbox मी कित्येकदा अनुभवला आहे...ponting नी
घेतलेला एक टप्पा कॅच कोट्यावधी लोकांच्या शिव्या कॅच करून गेला...

                आम्हाला फक्त विजय हवा...आम्हाला पराभव खपत नाही...आणि आम्ही तो खपवून पण घेणार नाही....
हे आमच्या संघाचे ब्रीदवाक्य नाही...हा आमचा क्रिकेट पाहतानाचा दृष्टीकोन आहे...
आणि त्यात म्हणजे आमची टीम नंबर वन आहे...आता नंबर वन टीम हरणे म्हणजे आमच्या सारख्यांनी कोणाकडे
बघायचे ...तुम्ही काहीही करा...मरा तिकडे...पण विजय आपलाच झाला पाहिजे...पैसे मिळतात त्याचे तुम्हाला...
आणि समजा तुम्ही हरलात तर..
आम्ही तुमची घरे फोडणार...आम्ही तुमचे पोस्टर जाळणार..आम्ही social networking साईटस वर तुम्हाला शिव्या
घालणार....एवढा मात्र प्लीज सहन करा...म्हणजे काही पर्याय नाहीये तुम्हाला...

                सरडा देखील इतके रंग बदलू शकणार नाही तितक्या झटपट आम्ही आमचे टीम विषयीचे मत बदलतो...
सेहवागच्या शतकाचे कौतुक आम्ही पुढच्या शून्याने सहज झाकतो...
माणसे असलात म्हणून काय झाला...भारताचे प्रतिनिधित्व करताय..विजय हा हवाच...
४ महिन्यापूर्वी जिंकलेल्या World Cup चा विसर आम्हाला ४ महिन्यानंतरच्या २ टेस्टच्या पराभवाने पडतो...
२ टेस्ट  मध्ये हरल्यावर...हि कसली नंबर वन टीम असे म्हणण्यासाठी आम्ही सहज तयार असतो...कारण क्रिकेट
आमच्या रक्तात आहे...
रैनाच्या हूक शॉट च्या सिक्सवर नाचलेले सगळे...आता त्याला शोर्ट ball खेळता येत नाहीत असे म्हणून मोकळे होतात..
                ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला मात दिल्यावर...आता इंग्लंड कडून हरल्यावर ..भारतात शेर..परदेशात ढेर असा
म्हणायला आमची जीभ चाचरत नाही...कारण क्रिकेट आमच्या रक्तात आहे...
आमच्या  इथे ४ महिन्यापूर्वी mature असलेला सचिन..४ महिन्यानंतर immature होतो ...कारण ऑफ स्टंप च्या बाहेरचा साधा ball  त्याला सोडता येत नाही असे आमच्या जाणकार प्रेक्षकांना वाटते.
World  Cupच्या  matches साठी शाळा, कॉलेजेस,  ऑफिसेस ला सुट्टी टाकून घरी match बघणारे ...आता आमचा क्रिकेट
मधील रस कमी होत चालला आहे...हे जाहीर करून मोकळे होतात....कारण आम्ही पराभव पचवू शकत नाही...
 " काय तुमचा द्रविड, काय तुमचा सेहवाग, काय तुमचा लक्ष्मण...२०० रन्स पण करू शकत नाहीत इतके साधे सोपे आणि सरळ मत नोंदविणाऱ्या लोकांसाठी मी माझ्या हृदयात एक वेगळी जागा तयार केली आहे...
पण सध्या अशी लोक इतकी झालीयेत कि portable हृदय घ्यावं लागेल  कि काय असा वाटायला लागलंय...
स्कोअर काय झाला..असे फोन करून विचारणारे..."अरे काय हरणाऱ्या matches बघता" असे येत जाता सांगायला लागले आहेत..
आणि वर म्हणतात कि काही होऊ शकणार नाही आपल्या टीमचे..हसावे कि रडावे काहीच कळत नाही..
पाकिस्तान विरुद्धची World Cup match पाहताना जिंकावे म्हणून देव पाण्यात ठेवणाऱ्या आजी आज Edjbaston ची
match चालू असताना आपल्या टीमलाच पाण्यात पाहतात.

                " Captain Cool " असणारा आमचा धोनी..साधे Decision पण घेता येत नाहीत म्हणून शिव्या खातो...इतके दिवस धोनीची batting कशी आहे याचा विसर पडलेली तज्ञ मंडळी आज हरलो म्हणून ...batting जमत नाही  म्हणून तोंडसुख घ्यायला मोकळे झाले आहेत.." Batting जमत नसेल तर टीम मध्ये जागा अवघड आहे " हे विधानच खूप बोलके आहे.
इंग्लंड चे लोक सहज रन्स करतात आणि आपल्या लोकांना इतके साधे जमू नये ....???
या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही...कदाचित ते म्हणतात ते बरोबर असेल देखील...पण रन्स करणे हे "इतके साधे " असू शकते का ?
मी प्रतिप्रश्न केला कि आमच्या लोकांनी World  Cup उचलला...इंग्लंड ला एवढे साधे जमू नये ???
२ Match मधल्या पराभवामुळे ४ match ची सिरीज " सहज whitewash " असे भाकीत करणाऱ्या भारतीय चाह्त्यांच्ये टीम ला असलेल्या पाठिंब्याचे आणि विश्वासाचे करावे तेवढे कौतुक कमीच....
परवा एका ठिकाणी वाचले...."भारतीय विजयाचा अश्वमेध इंग्लंड ने रोखला.."...अहो रोखला ???
पळायला सुरुवात तरी करू द्या की...
                ...स्वतः हातात bat देखील न घेतलेली मुल म्हणतात...भारतात जिंकणे ठीक आहे पण भारता बाहेर जिंकून दाखवा ...यांना reply देणे किव्वा या वाक्याला reaction देणे देखील मला अवघड झाले आहे..
" असतील शिते तर जमतील भुते " इथपर्यंत ठीक होता...पण हल्लीच्या भूतांना रोज नवीन खायला पाहिजे...नुसतं शितांनी काम होत नाही असा दिसतंय एकूण ..आणि आधी खाल्लेल्याची कदर पण राहिली नाहीये...
न्यूज Channel वाल्यांची headings बघूनच आश्चर्य वाटते...
"क्या यही ही हमारे World Champions ???"
हा हा हा ...अहो मग World Cup जिंकला तेव्हा यांचेच फोटो दाखवले होते तुम्ही ..का लक्षात नाही का ??
नाही तसं यात त्यांची चूक काहीच नाहीये म्हणा, कारण पाहणारे करोडो लोक विसरू शकतात तर ते बिचारे १० x १० च्या खोकड्यात बसणारे कसे लक्षात ठेवतील ?
                IPL मध्ये jersy विकत आणून आपल्या टीमला support करणारे...IPL मुले injury झाल्या हे स्टेटमेंट आत्ता देतात हे ऐकून फार बरे वाटते...जेव्हा हरतो तेव्हाच कशी injury दिसते काही कल्पना नाही..पण दिल्लीच्या  IPL match ला सेहवाग injured झाला हे Loards वर मुकुंद ओपनिंग ला आल्यावर लोकांना समजले याचे आश्चर्य जास्त...आणि injury नंतर फक्त एक practise match खेळून टेस्ट खेळायला आलेला सेहवाग जेव्हा ० वर आउट झाला तेव्हा ..." हेच करायला इंग्लंड ला गेला होता का ? ..हेच करायचे होते तर त्यासाठी इतके लांब जायची गरजच नव्हती " असे म्हणून मोकळे होणारे लोक आज माझ्या अवतीभोवती आहेत...
...या टेस्ट मध्ये आपला काही खरं नाही आता ..असे पहिल्या दिवशी लंचच्या आधी..१ आउट ८० असताना { आपला (भारताचा ) } म्हणणारी लोक आहेत...हा हा...अहो एवढी दूरदृष्टी जर असेल तर टेस्ट ५  दिवसाची खेळायची काहीच गरजच नाही असे माझे खूप वय्याक्तिक मत आहे.

प्रश्न Support करणे अथवा न करणे याचा अजिबात नाहीये...पण आपले मत मांडताना थोडा प्राथमिक विचार केला तर जास्त उचित होईल असे माझे मत आहे..
पण खरय ..अश्या लोकांच्या सहवासात राहून विजय मिळवणे...आणि पराभव पचवणे म्हणजे काय असते हे फक्त ते ११ खेळाडूच अनुभवत असतील जे मैदानावर खेळतात...
कारण ते अश्या टीम कडून खेळत असतात की जिथे राहणाऱ्या लोकांचे प्रेम आणि द्वेष या मध्ये फक्त एक विजय किव्वा
  पराजय याची बारीक रेघ असते....आणि दोन्ही साठी त्यांना घरच मिळते...जिंकलो तर नवीन ..नाहीतर फोडलेले...

"Yea, I was in good touch today, I was knocking the ball very well, Ball was coming on to the bat nicely,
Wicket was playing good, Viru supported well too...Zak and Bhajji bowled well...MSD took 2/3 sharp n
hard decisions...n outcome is here for us...we managed to win the game......"

Presentation मधील सचिन चे बोल....

पण यानंतर तो जे म्हणाला...की 

" And the most important thing is ...The thousands of people supporting back in India...their good
wishesh and prayers paid off ...Thanks for your support..Hoping for the same support in future...Thank you"

वरच्या ४ वाक्यांनी आपल्याला फरक नसेल पडणार कदाचित ..पण शेवटच्या वाक्याचा एकदातरी विचार
व्हायला काहीच हरकत नाहीये.... कारण क्रिकेट आपल्या रक्तात आहे...

                                                      -   हृषीकेश पांडकर
                                                            १२-०८-२०११