Monday, January 25, 2010

दीपस्तंभ ..... समाज सेवेच्या पलीकडले....


          आज गेले दीड वर्ष मी एका संस्थेशी सलग्न आहे ....याचा अर्थ मी त्या संस्थेसाठी काम करीत आहे किव्वा मी माझे नाव त्या संस्थेत नोंदविले आहे असा काहीसा होतो ..मात्र मी ज्या संस्थेशी सलग्न आहे हि एक तिराहित गोष्ट आहे असे मी कधी मानूच शकत नाही.केवळ रविवारी जमून दोन तास सामाजासाठीकाहीतरी करणे या पलीकडे जाऊन विचार करावा अशी इच्छा झाली आणि कागदाला पेन लावायची गरज वाटली एवढेच......
       दीपस्तंभ ने समाजाला काय दिले हा वेगळाच मुद्दा आहे..इथे मी विचार करतोय कि दीपस्तंभ ने मला काय दिले याचा...थोडा स्वार्थ दिसून येईल पण मला याचे काहीच वाटत नाही.आज मागे वळून पाहायला फार त्रास पडणार नाही ..कारण आम्ही आत्ता फक्त दीड वर्षाचे आहोत पण या थोड्या वेळात मी काय मिळवले याची यादी वाचायची ठरवली तर ते शक्य नाही इतकी ती मोठी आहे....
       आधी मित्र या शब्दाची व्याख्या काही वेगळीच होती . संध्याकाळी घराबाहेर जे भेटतात ते मित्र , रविवारी त्यापेक्षा थोड्यावेळ जास्त भेटतात ते मित्र,आणि सुट्टीमध्ये घरच्यांपेक्षा वेगळ्या लोकांबरोबर ट्रीप ला जाऊ शकतो ते मित्र . हि ढोबळमानाने सगळीकडे असणारी मित्रत्वाची व्याख्या ( मी पुस्तकातील व्याख्या लिहिलेल्या नाहीत ) .

         दीपस्तंभ join केले तोच मुळात दीपस्तंभ चा पहिला दिवस...म्हणजे पहिल्या दिवसापासून DS ची प्रगती जवळून पाहता आली......अधोगती झाली देखील नाही आणि होणार पण नाही त्यामुळे ती बघायची संधी मिळेल असे वाटत नाही.....सुदैवाने .....एका मित्राने फोन केला " अरे आम्ही मित्र मिळून एक छोटा ग्रुप सुरु करतोय,समाजासाठी जशी जमतील तशी कामे करायची....इच्छा असेल तर आम्हाला जॉईन हो ...." यासाध्या एका फोन वर " बघू तरी काय असते " या अविर्भावात रविवारी गेलो आणि जे पहिले ते थक्क करणारे होते...आपल्याच वयाची पन्नास मुले व मुली अशाच एखाद्या मेसेज व call मुले तिथे जमली होती. ..काय होणार हे माहित नव्हते. ...तिथे काय झाले हे सांगणे अनावश्यक आहे .पण तिथून पुढे काय झाले हे सांगण्याच्या हा खटाटोप....

           नंतर प्रत्येक activity साठी न चुकता रविवारी भेटत राहिलो..तसे पाहायला गेलो तर मी सकाळचे दोन तास देणे हे माझ्यासाठी कधी अवघड नव्हते..तसेही घरीच असायचो..पण अशा activity मुळे तेच दोन तास ( आम्ही मेल मध्ये दोनतास लिहितो ) एका वेगळ्याच दुनियेत नेऊन ठेवत होते...

           उद्या DS ची activity आहे हि कल्पनाच एक आनंद देणारी आहे....
सुरुवातीला तळजाई ला हाताने कचरा उचलला...पण " अरे आपण काय फालतू कामा करतोय " असे कधी चुकून देखील वाटले नाही..पण लोकांच्या प्रतिक्रिया आणि स्वताचे समाधान सुखावणारे होते...
महात्मा सोसायटी मधील एका घरात कचऱ्यापासून खत कसे बनवितात हे बघायला मिळेल अशी पुसटशी कल्पना देखील नव्हती...खंडोजीबाबा चौकात भर रस्त्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून इतर लोकांना आदेश द्यायची संधी मिळाली....सगळ्या गोष्टी आहेत तश्याअनुभवल्या....
         नवीन मित्र मिळाले आणि जुने आधीक जवळ आले हे वेगळे सांगायची गरज नाही.....खरे तर DS जॉईन करायच्या वेळी आम्ही ओळखीचे फक्त २/३ लोक होतो.पण आता तीच संख्या निश्चितच वाढली.
" आज आमची मिटिंग आहे " हे वाक्य म्हणायची इच्छा होती...ती पूर्ण झाली...( या आधी मी कोणतीच मिटिंग attained केली नव्हती )
           आज रानडे मध्ये चहा घ्यायला बसल्यावर वकिला समोर सी.ए. ,इंजिनिअर समोर एम.बी.ए , आर्किटेक्ट समोर एखादा editor ....हे दृश्य आता नेहमीचेच झाले आहे...आणि मी त्यातील एक हिस्सा आहे याचा आनंद वेगळाच....रविवार च्या संध्याकाळी भर लक्ष्मी रोडवर रिकाम्या पिशव्या वाटत फिरावे लागेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते...पण हा एक वेगळाच आणि आनंददायी अनुभव आज माझ्याबरोबर आहे...

         दिवाळी,दसरा,संक्रांत घरच्यांबरोबर नेहमीच साजरी केली..पण मित्रांबरोबर साजरी करणे काय असते हे पहिल्यांदा अनुभवले....
" Activity किती वाजता आहे " हे विचारणारे फोन " आज पिक्चर ला जाऊ " याने replace झाले .....
ट्रीप ला जाताना २५ लोकांचा विचार करायची जेव्हा वेळ येते तेव्हा काय होते...याची प्रचीती आली..
        प्रत्येक activity झाल्यावर त्या activity ला काय केले कुठे चुकलो...कुठे मजा आली..कुठे बोर झाले...अजून पुढच्या वेळी काय करता येईल....हि चर्चा करण्यात घालविलेला वेळ केवळ अविस्मरणीय..
पेपरbags तयार करताना पार्किंग मध्य बसून कोणत्या level चा timepass करता येतो याचा साधारण अंदाज आला....

         एखादी जबाबदारी अंगावर आल्यावर ती पूर्ण केल्याचा आनंद लपविणे जमले नाही...आणि इच्छा देखील झाली नाही ....लपवायची...चांगल्या कामाचे वेळोवेळी appreciation मिळाले..सुधारणा कशा करता येतील हे समजले...


         कोजागिरी पौर्णिमेला दुध संपविण्यासाठी प्यायलेले ३ ग्लास .....आणि मिटिंग ला उशीर झाला म्हणून न मिळालेला चहा या दोनही गोष्टी तितक्याच जवळच्या वाटल्या.....रक्तदान करताना देखील फोटोग्राफी ची हौस भागवून घेतली....कमलिनी कुटीर ला झालेली ट्रीप हा DS च्या वाटचालीतील मैलाचा दगड ..खूप नवीन मेम्बर्स मिळाले..अनेक ओळखी झाल्या..दिवसभर केलेली मजा विसरणे केवळ अशक्य.....( कमलिनी कुटीर ऐवजी गिरीवन हा शब्द टाकून पुन्हा तीच ओळ वाचली तरी चालू शकेल )
समाजसेवा करत असतानाच या गोष्टी देखील मिळाल्या याचा आनंद अधिक...

मात्र या गोष्टी मिळत असतानाच ,अनुभवत असतानाच ज्या हेतूने DS ची सुरुवात झाली तो मुद्दा कधी बाजूला राहीलाय असे झालेच नाही आणि होणारही नाही...हे निश्चित

असेच अनुभव येत राहतील याची खात्री आहे...आणि त्यासाठी मी तयार देखील आहे..... :)

हृषीकेश पांडकर

२५ जानेवारी, २०१०